रंजना देशमुख | |
---|---|
जन्म |
रंजना देशमुख इ.स. १९५५ |
मृत्यू |
३ मार्च, इ.स. २००० शिवाजी पार्क, मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
आई | वत्सला देशमुख |
रंजना देशमुख (-, १९५५ - मार्च ३, २०००; मुंबई) ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री होत्या. भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांची ती नात होय. इ.स. १९७०-१९८० च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ह्या रंजनांची मावशी होय. आपल्या मावशीप्रमाणेच रंजना ह्यांनी व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना यांचा राज्यसरकारचा १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. सन १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.
इ.स. १९८७ साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. इ.स. १९८७ साली, कोल्हापूर येथे अपघाती निधन झाले त्यांचे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |