![]() | |
ब्रीदवाक्य | अंतरी पेटवू ज्ञानज्योत। |
---|---|
Campus | शहरी, ६५०एकर |
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (आधीचे : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) हे महाराष्ट्रातील जळगाव येथे स्थित एक विद्यापीठ आहे याची स्थापना १९९० साली झाली होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात येतात.[१] विद्यापीठाचे आधीचे नाव (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) बदलून ते "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" असे करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून ८ कि.मी. अंतरावर आहे आणि आशिया महामार्ग क्र. ४६ पासून दीड किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र ६५० एकर (२.७ चौरस किमी ) विस्तारलेले आहे.