Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ११, इ.स. १९०८ Kodumudi | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १५, इ.स. १९८० | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
कोडुमुडी बालंबाल सुंदरंबल [१] (११ ऑक्टोबर १९०८ - १५ ऑक्टोबर १९८०) इरोड जिल्ह्यातील तमिळनाडू येथील एक भारतीय अभिनेत्री आणि गायिका होती. तिने तमिळ सिनेमांमध्ये अभिनय केला आणि तिला "भारतीय रंगमंचाची राणी" म्हणून संबोधले गेले.[२] भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय कार्यकर्ते असलेली सुंदरंबल ही भारतातील राज्य विधानसभेत प्रवेश करणारे पहिले चित्रपटातील व्यक्ति होती.[३]
के.बी. सुंदरंबल यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९०८ रोजी तामिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील कावेरी नदीच्या काठावरील कोडुमुडी गावात झाला. लहानपणी तिने ट्रेनमध्ये गाणे गाऊन पैसे कमवले.[४] काही स्त्रोतांनुसार,[४] अशा प्रकारे ट्रेनमध्ये गाताना १९ वर्षीय सुंदरंबलने एफजी नटेसा अय्यर, एक हौशी रंगमंच अभिनेता, निर्माता यांचे लक्ष वेधून घेतले. इतर स्त्रोतांनुसार,[५] सुंदरंबलमधील प्रतिभा बघुन तिची ओळख त्या काळातील गाजलेल्या नाटककारांपैकी एक असलेल्या पी.एस. वेलू नायर यांच्याशी एका कृष्णस्वामी अय्यर नावाचा पोलिस अधिकारीने करून दिली.
दोन्ही बाबतीत, सुंदरंबल यांनी १९२७ मध्ये, तामिळ रंगमंचावर, प्रवासी नाट्य मंडळाच्या सदस्या म्हणून पदार्पण केले असे मानले जाते. रंगमंचावर छोट्या-छोट्या भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना तिने गायन चालू ठेवले. तिची "वल्ली थिरुमनम," "पावलकोडी" आणि "हरिश्चंद्र" सारखी सुरुवातीची नाटके खूप गाजली. विशेषतः, "वल्ली थिरुमनम", जिथे तिने एसजी किट्टाप्पा सोबत सह-कलाकार केला होता, तो एक अभूतपूर्व यश होता.
सुंदरंबल यांनी चित्रपटांमध्ये अभिनय केला जसे कीमनिमेखलाई, औवैयार (१९५३), थिरुविलयादल (१९६५), कराईकल अम्मैयार (१९७३) आणि कंदन करुणाई (१९६७). तिने थिरुविलायदल आणि कंदन करुणाई या चित्रपटांमध्ये तमिळ कवी अववायार यांची भूमिका साकारली होती. तिने उईर मेल असाई (१९६७), थुनाइवन (१९६९)आणि ग्नायरू थिंगल सारख्या सामाजिक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
तिने चित्रपटांमध्येही गाणी गायली. तिने संगीत दिग्दर्शक मायावरम वेणू, एम.डी. पार्थसारथी, परूर एस. अनंतरामन, आर. सुदर्शनम, के.व्ही. महादेवन, एस.एम. सुब्बय्या नायडू, टी.के. राममूर्ती, एम.एस. विश्वनाथन आणि कुन्नाकुडी वैद्यनाथन यांच्या सोबत काम केले.
सुंदरंबल आणि त्यांचे पती एस.जी. किट्टाप्पा यांच्यावर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा खूप प्रभाव होता आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उत्कट समर्थक बनले. त्या कारणासाठी त्यांनी त्यांची लोकप्रियता आणि प्रतिभा वापरली होती. सुंदरंबल यांनी चळवळीचे काम सुरू ठेवले, अनेक ग्रामोफोन डिस्क रेकॉर्ड करून त्या संघर्षाचे आणि त्यागाचे गुणगान केले. तिने नेहमी खादी परिधान करण्याचा मुद्दाही बनवला.[४] तिने अनेकदा विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सक्रियपणे प्रचार केला.[६] भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, के.बी. सुंदरंबल यांनी १९५१ मध्ये मद्रास राज्याच्या विधान परिषदेत काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रवेश केला, अशा प्रकारे भारतीय विधानमंडळात प्रवेश करणारे पहिले चित्रपट कलाकार बनली.
थिएटरमध्ये एकत्र काम करत असताना, सुंदरंबलची एस.जी. किट्टाप्पा यांच्याशी भेट झाली. १९२७ मध्ये त्यांचे लग्न झालेव १९३३ मध्ये किट्टप्पा यांचे निधन झाले. मैफिलीतील कलाकार म्हणून कारकीर्द करण्यासाठी सुंदरंबल यांनी त्यांच्या मृत्यूनंतर रंगमंच सोडला. के.बी. सुंदरंबल यांचे सप्टेंबर १९८० मध्ये निधन झाले.
१९६४ मध्ये, तमिळ इसाई संगमने त्यांना "तमिळ इसाई पेरारिग्नार (तमिळ संगीतात सर्वाधिक शिकलेली)" ही पदवी बहाल केली. १९७० मध्ये, भारत सरकारने त्यांना कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री देऊन सन्मानित केले. १९६९ मध्ये थुनाइवन चित्रपटामधील तिच्या कामासाठी तिला भारत सरकारने सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित केले.[७] सोबत तिने सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारही जिंकला.