राजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ काश्मिरी कवी कल्हण याने इसवी सन ११४७ ते ११५२ या काळात रचला. या दीर्घकाव्यामध्ये काश्मीरचा इतिहास, भूगोल, निरनिराळ्या जनसमूहांची मिसळण आणि काश्मीरची संस्कृती यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत. आठ तरंगांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेल्या या संस्कृत काव्यात ७,८२६ श्लोक आहेत.
या पुस्तकाप्रमाणे काश्मीरचे जुने नाव ‘कश्यपमेरु’ होते.
काश्मीरमध्ये सर्वात आधी पांडवांमधला सर्वात छोटा भाऊ सहदेव याने राज्य स्थापले, असे राजतरंगिणीच्या प्रथम चरणात लिहिले आहे. इ.स.पूर्व २७३ साली काश्मीरमध्ये बौद्ध धर्म आला, असे हा ग्रंथ सांगतो..