रामराव उर्फ अण्णासाहेब माधवराव देशमुख (नोव्हेंबर २५, इ.स. १८९२ - एप्रिल २०, इ.स. १९८१)
शिक्षण :
हे अमरावतीमधील एक बॅरिस्टर होते. यांचे शिक्षण अमरावती येथील स्कूलमधून झाले, तर उच्च शिक्षण केंब्रिजमधून..
राजकीय जीवन:-
राजकीय कार्यः
तत्कालीन मध्यप्रांत व वऱ्हाडातील एक प्रमुख पुढारी, राजकारणी व मराठी भाषिकांचा महाराष्ट्र हा प्रांत बनविण्यात यावा ही मागणी सर्वप्रथम करणारे नेते होते. त्याचप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थानातील एक प्रमुख राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील विदर्भातील फार मोजक्या बॅरिस्टरांपैकी (कायदेपंडित) पैकी ते एक होत. स्थापण करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९२५-२६ वेरार लॅन्ड रेव्हेन्यू कोड सी.पी अँड बेरार लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने मंजूर केले होते. त्याचा आराखडा तयार करतांना बॅ. रामराव माधवराव देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य करण्याची सचोटी पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची सन १९४७-४८ या कालखंडात रेवा राज्याचे मुख्य प्रधान म्हणून नेमणूक केली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |