सत्यपाल मलिक | |
१९ वे मेघालयचे राज्यपाल
| |
विद्यमान | |
पदग्रहण १८ ऑगस्ट २०२०-2 October 2022 | |
मुख्यमंत्री | कॉनराड संगमा |
---|---|
मागील | तथागत रॉय |
१८ वे गोव्याचे राज्यपाल
| |
कार्यकाळ ३ नोव्हेंबर २०१९ – १८ ऑगस्ट २०२० | |
मागील | मृदुला सिन्हा |
पुढील | भगतसिंग कोश्यारी |
कार्यकाळ २३ ऑगस्ट २०१८ – ३० ऑक्टोबर २०१९ | |
मागील | नरिंदर नाथ वोहरा |
पुढील | पद रद्द गिरीशचंद्र मुर्मू (उप राज्यपाल म्हणून) |
२७ वे बिहारचे राज्यपाल
| |
कार्यकाळ ३० सप्टेंबर २०१७ – २१ ऑगस्ट २०१८ | |
मागील | केशरीनाथ त्रिपाठी |
पुढील | लालजी टंडन |
२५ वे ओडिशाचे राज्यपाल
| |
कार्यकाळ २१ मार्च २०१८ – २८ मे २०१८ | |
मागील | एस.सी. जमीर |
पुढील | गणेशीलाल |
कार्यकाळ १९८९ – १९९१ | |
मतदारसंघ | अलीगढ |
कार्यकाळ १९८० – १९८९ | |
मतदारसंघ | उत्तर प्रदेश |
जन्म | २४ जुलै, १९४६ हिसवाडा, संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत[१] |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
मागील इतर राजकीय पक्ष | भारतीय क्रांती दल, भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस, जनता दल, लोक दल, समाजवादी पक्ष |
निवास | राजभवन, शिलाॅंग, मेघालय |
धर्म | हिंदू |
सत्यपाल मलिक (२४ जुलै, १९४६ - ) हे मेघालयचे १९ वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत.[२] ते गोव्याचे १८ वे राज्यपाल होते.[३][४] मलिक हे पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याचे राज्यपालही होते. ते ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर १०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते आणि त्यांच्या कार्यकाळातच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा घटनात्मक निर्णय ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आला.
याचे पहिले प्रमुख राजकीय पद १९७४-७७ दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्यत्व होते. १९८० ते १९८६ आणि १९८६-८९ या काळात त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. १९८९ते १९९१ या काळात ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलीगढमधून ९ व्या लोकसभेचे सदस्य होते. ते ऑक्टोबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत बिहारचे राज्यपाल होते.[५][६] २१ मार्च २०१८ रोजी त्यांना २८ मे २०१८ पर्यंत ओडिशाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांची जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपत येथील हिसावडा गावात जाट कुटुंबात झाला.[७][८][९] राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मेरठ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.[१०][११]